यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी समाजातील विविध घटकांच्या गरजा ओळखून अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल, असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आयोजन खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, माजी सरपंच तथा श्री समर्थ महिला मंडळ अध्यक्षा वनिताताई विजय पाटील, प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका मिनलताई पाटील, उदय पाटील तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
0 Comments